Monday, December 3, 2012

केवळ शिक्षणामुळे उद्योजक होता येत नाही

केवळ शिक्षणामुळे उद्योजक होता येत नाही
दीपक घैसास यांचे मत
शिक्षणामुळे उद्योजक होता येत असं नाही, तर अनुभवदेखील उद्योजक बनण्याची गुरुकिल्ली आहे, असे विचार प्रसिद्धउद्योजक दीपक घैसास यांनी विद्यार्थीउत्कर्ष मंडळ आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत मांडले. 'चाहूल नव्या उद्योजकांची' या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. जुनी कल्पना नव्या पद्धतीने मांडल्यास त्यातूनही उद्योग जन्माला येतो, असेही त्यांनी सांगितले.
उद्योग करायचे असल्यास आत्मसंतुष्ट राहू नका, असे सांगतानाच मारवाडी लोकांची मानसिकता जाणून घेणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक माणसाच्या मनातील असमाधान आणि असंतुष्टता हा नवनवीन कल्पनांना जन्माला घालते. त्यातूनच उद्योगही जन्माला येत असतो. उद्योगात ब्रँडिंग असणे गरजेचे आहे परंतु आपल्या उद्योगाबद्दल आस्था, विश्‍वास आणि तो भरभराटीला नेण्याची प्रबळ इच्छा मनात असणे गरजेचे आहे, असे घैसास यांनी सांगितले.
व्याख्यानमालेच्या शेवटी आत्मविश्‍वासाची छत्री घेऊन बाहेर पडा, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. या वेळी बोधपट वाचन चैतन्य पंदे यांनी केले. घैसास यांनी विद्यार्थीउत्कर्ष मंडळाला व्याख्यानमालेबद्दल शुभेच्छा देऊन नवनवीन विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरित केले.

No comments:

Post a Comment

Blog Archive